
मी एका प्रसिद्द सोसीअल नेटवर्क (www.facebook.com) वर नेहमी ब्लॉग लिहित असतो काल मी सहज महात्मा गाँधी यांच्या बद्दल लिहिले, नाही त्यांचा फक्त फोटो लावला मी माझ्या प्रोफाइल मध्ये तर आपल्या भारतीय लोकानना कोण जाने कायवाटले मला चक्क १५ ते २० कमेंट्स तेहि अगदी विखारी ऐकायला माफ़ करा पहायला मिळाले। अरे माझ्या भारतीय मित्रनानो या देशात महात्मा गाँधी एवढे घृणा पात्र कधी पासून झालेत? या देशासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, जय महात्म्याच्या स्मृति साठी दक्षिण आफ्रिकेत त्याचे पुतले उभारले जातात त्यांना आपण अशी वागणूक द्यावी हे पाहून मला आश्च्यार्या च धक्काच बसला. या देशाची ओळख महात्मा गाँधी आहेत हे आपण विसरून चालणार नाही। आपण दुसर्यावर सहज टीका करतो तो आपल्या लोकांचा स्वाभाव आहेच, पण टीका करतांना आपण हे लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे की तीन बोते ही आपना कडेच आहेत.